Premium|Study Room : ‘फोडा आणि राज्य करा’ला जनतेचा प्रतिकार; बंगाल फाळणीच्या वेदनेतून स्वदेशी, स्वावलंबन आणि राष्ट्रभावनेचा उदय

Partition of Bengal 1905 History : १९०५ ची बंगालची फाळणी आणि त्यातून उभी राहिलेली स्वदेशी चळवळ हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वाभिमानाचा हुंकार होता. ब्रिटिशांच्या 'फोडा आणि राज्य करा' नीतीला भारतीयांनी 'आत्मशक्ती' आणि बहिष्काराने दिलेले हे चोख प्रत्युत्तर होते.
Partition of Bengal 1905 History

Partition of Bengal 1905 History

esakal

Updated on

लेखक : रमेश शिंगाडे सर

१९०५ साली लॉर्ड कर्झन याने केलेली बंगालची फाळणी हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचा आणि वेदनादायक टप्पा होता. त्या काळी बंगाल हा भारतातील सर्वात मोठा आणि प्रभावशाली प्रांत होता. ब्रिटिश सरकारने प्रशासन सुलभ करण्याचा बहाणा करून हा निर्णय घेतला, परंतु त्यामागे ‘फोडा आणि राज्य करा’ हीच नीती स्पष्ट दिसत होती. हिंदू आणि मुस्लीम समाजात फूट पाडून आपले राज्य मजबूत करण्याचा हा प्रयत्न होता. फाळणीची मूळ कल्पना मांडताना लॉर्ड रिस्ले याने म्हटले की, ‘एकसंध बंगाल ही एक शक्ती आहे; विभागलेल्या बंगालचे परिणाम अनेक वेगवेगळ्या दिशांना खेचले जातील.’

विभाजनानुसार बंगालचे दोन भाग करण्यात आले. पूर्व बंगाल आणि आसाम (जिथे मुस्लीम लोकसंख्या जास्त होती) आणि पश्चिम बंगाल (जिथे हिंदू लोकसंख्या अधिक होती). हा निर्णय जाहीर होताच संपूर्ण देशात असंतोषाची लाट उसळली. लोकांना हे फक्त प्रशासनिक बदल नसून त्यांच्या एकात्मतेवर घाला आहे, असे वाटू लागले. बंगालमधील सामान्य नागरिकांपासून ते बुद्धिजीवी वर्गापर्यंत सर्वांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com