

Parliamentary Stability India
esakal
कल्याणी शंकर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक - sarkarnama@esakal.com
संसदीय स्थैर्य आणि स्वायत्तता निश्चित करण्यासाठी लोकसभेच्या अध्यक्षपदाचे महत्त्व आहे. नुकताच संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव फेटाळण्यात आला. लोकसभेचे अध्यक्ष हे राष्ट्रपती आणि इतर विधिमंडळ संस्थांशी सभागृहाच्या संवादाचे ‘व्यवस्थापन’ करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात; तसेच मतदान घेण्याचा आणि विधायक कार्यक्रमाला दिशा देण्याचा अधिकार त्यांच्याकडे असतो. संसदेतील अविश्वास प्रस्तावाच्या निमित्ताने..
विरोधी पक्षांनी ११ मार्च २०२६ रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात मांडलेला अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळून लावण्यात आला. हा प्रस्ताव अंदाजे चार दशकांनंतर मांडण्यात आला होता. तो लोकसभेत बहुमताने फेटाळण्यात आला. अध्यक्ष सभागृहातील शिस्त राखण्यात, संसदीय नियमांचे पालन होण्यात आणि पक्षभेद न करता सर्व सदस्यांना बोलण्याची समान संधी मिळेल याची खात्री करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. अध्यक्षांच्या अधिकाराला दिलेले आव्हान अनेकदा संसदीय प्रणालीच्या कार्यप्रणाली आणि प्रामाणिकतेबद्दल व्यापक चर्चा निर्माण करते.
अध्यक्षांविरुद्ध वारंवार अविश्वास प्रस्ताव किंवा प्रश्न उपस्थित होणे हे सभागृहातील राजकीय तणावाचे प्रतिबिंब आहे. यामुळे सत्तेचे संतुलन आणि सभागृहातील सदस्यांमध्ये परस्पर आदराची गरज याबाबत मूलभूत प्रश्न निर्माण होतात. म्हणूनच अध्यक्षांची भूमिका केवळ विधायक प्रक्रियेसाठीच नव्हे, तर संसदीय लोकशाहीत विश्वास आणि सहकार्य वाढविण्यासाठीही अत्यावश्यक ठरते.