गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून स्टार्टअप, आज भारतातील अग्रगण्य EDU TECH कंपनी
आपण सर्वांनी थ्री इडियट्स हा सिनेमा पहिला असेलच. त्यातील आमिर खान याचं एक वाक्य सर्वांना कायम प्रेरणा देतं. या सिनेमात आमिर खान सर्वांना एकच गोष्ट वारंवार सांगत असतो ती म्हणजे "Excellence का पीछा करो कामयाबी झक मार के आएगी". म्हणजेच मेहनतीने, जिद्दीने तुम्ही कोणतही काम, गोष्ट शिकून घेतलीत तर त्याचं चांगलं फळ तुम्हाला कधीना कधी नक्कीच मिळतं.
हा लेख देखील अशाच एका व्यक्तीचा आहे ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या आणि जिद्दीच्या जोरावर प्रचंड स्पर्धा प्रचंड आणि अपुऱ्या संसाधनात देखील केवळ स्वतःच्या कल्पनेच्या जोरावर एक स्टार्टअप सुरु केला. आज भारतात आणि जगभरात हाच स्टार्टअप एक मोठी कंपनी बनलेली आपण पाहतोय. या मल्टिनॅशनल कंपनीची सध्याची किंमत काही हजार कोटींमध्ये आहे. या कंपनीच्या माध्यमातून आपल्या भविष्यावर प्रचंड परिणाम होणार तर आहेच, सोबत जुन्या शिक्षणाच्या व्याख्या बदलणारा हा स्टार्टअप ठरतोय.
या कंपनीचं नाव आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. या स्टार्टअपचं नाव आहे 'बायजू'. या लेखाच्या माध्यमातून बायजू याना नक्की शिक्षण क्षेत्रात काहीतरी अमूलाग्र बदल घडवण्याची संकल्पना आली कुठून, त्यामागे त्यांनी किती मेहनत घेतली गेली या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत.
२०११ मध्ये झाली कंपनीची सुरवात
बायजू'स च्या जाहिराती टीव्हीवर, वर्तमानपत्रात किंवा सोशल मीडियावरील जाहिरातींमधून कायम आपल्या समोर येत असतात. ही बायजू कंपनी दक्षिण भारतातील बंगलोरमधील एक कमोदिनी आहे जी शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि ऑनलाईन शिक्षणावर काम करते. २०११ मध्ये या कंपनीची सुरवात झाली. अर्थात त्यावेळी अगदी काही जणांनाच या कंपनीबाबत माहिती होती. मात्र आता ही जगभरातील एज्युटेक म्हणजेच शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखली जाते.
"माझं शिक्षण मल्याळम माध्यमाच्या शाळेत झालं, आणि मी क्रिकेटची कॉमेंट्री ऐकून इंग्रजी शिकलो" - बायजू रवींद्रन