

सुभाष तुकाराम पाटील
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या कुशीत आमचे ओलवण गाव वसले आहे. राधानगरी धरण आणि दाजीपूर अभयारण्य परिसरातील नैसर्गिक संपन्नता सर्वांनाच आकर्षित करते.
२०१२मध्ये हा परिसर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाला याचे आम्हा गावकऱ्यांना फार मोठे समाधान आहे. आमचे ओलवण गाव आणि इथला बारा वाड्यांचा गर्द झाडीचा परिसर जंगली जनावरांचाही अधिवास आहे. हा परिसर वर्षभर हिरवागार असतो, आणि सह्याद्रीच्या रांगांमुळे या परिसराला देखणे रूप प्राप्त झाले आहे.