

West Bengal election
esakal
मोदी सरकारच्या यंत्रणांनी पश्चिम बंगालमध्ये कारवाई करायची आणि तिचा ममता बॅनर्जी यांनी प्रतिकार करायचा, या ठरलेल्या ‘स्क्रिप्ट’च्या फलनिष्पत्तीविषयी नेहमीप्रमाणे उत्सुकता आहे. राज्यातील तीन आघाड्यांवर विधानसभा निवडणुकीतील शेवटचे मत मोजले जाईपर्यंत हे ‘युद्ध’ संपणार नाही.
नव्या वर्षात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या आडून होणाऱ्या राजकीय युद्धाचे रणशिंग फुंकले गेले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी, तृणमूल काँग्रेसविरुद्ध भाजप, केंद्राच्या तपास संस्था विरुद्ध पश्चिम बंगालची शासकीय यंत्रणा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाविरुद्ध निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर अशी तीन आघाड्यांवर विधानसभा निवडणुकीतील शेवटचे मत मोजले जाईपर्यंत हे ‘युद्ध’ संपणार नाही.