पुणे - देशात खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून एप्रिल ते जून या तिमाहीत रासायनिक खतांचा वापर १३ टक्क्यांनी वाढल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. परंतु प्रत्यक्षात या तिमाहीतील खत मागणीच्या तुलनेत प्रत्यक्ष वापर १८ टक्क्यांनी कमी झाला आहे..देशातील खतांचे कमी झालेले उत्पादन आणि कमी आयात यामुळे ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना खत टंचाईचा सामना करावा लागत आहे. परंतु सरकारने मात्र गेल्या वर्षीच्या आकडेवारीशी तुलना करण्याची चलाखी दाखवत खत वापर वाढल्याचा दावा केला आहे.एप्रिल ते जून या तिमाहीत देशात युरिया, डीएपी, एमओपी आणि संयुक्त खतांचा वापर १२१ लाख टनांवर पोहोचला. गेल्या वर्षी याच तिमाहीत खतांचा वापर १०७ लाख टन होता. पण यंदाच्या पहिल्या तिमाहीत खतांची मागणी १४६ लाख टन इतकी नोंदविण्यात आली होती. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा खतांचा वापर जास्त दिसत असला तरी यंदाच्या मागणीपेक्षा वापर १८ टक्क्यांनी कमीच झालेला आहे..देशातील बहुतांश राज्यांमध्ये शेतकरी खतांची टंचाई असल्याच्या तक्रारी करत आहेत. खरिपाची पेरणी करण्यासाठी शेतकरी एप्रिल ते जून या काळात खतांची जास्त खरेदी करत असतात. दुसऱ्या तिमाहीत खतांची मागणी काहीशी कमी होते. त्यामुळे सरकारने खतांचे व्यवस्थित नियोजन केले तर टंचाईची परिस्थिती चिघळणार नाही, असे जाणकारांनी सांगितले..खतांची आयात घटलीएप्रिल ते जून या तिमाहीत एमओपीची आयात तब्बल ८१ टक्क्यांनी कमी होऊन १ लाख ११ हजार टन झाली. मागील वर्षी याच तिमाहीत एमओपीची आयात जवळपास ६ लाख टन होती. डीएपीची आयातही १० टक्क्यांनी कमी होऊन ११ लाख टनांवर स्थिरावली आहे.तर युरियाची आयात १३ टक्क्यांनी कमी होऊन ८ लाख ३८ हजार टन राहिली. केवळ संयुक्त खतांची आयात ४८ टक्क्यांनी वाढून साडेनऊ लाख टनांवर पोचली आहे..विक्री मर्यादादेशात खतांची टंचाई लक्षात घेऊन केंद्र सरकारने खतांच्या दैनंदिन विक्रीवर मर्यादा आणल्या आहेत, असे रसायने आणि खते राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी संसदेत सांगितले. अनुदानित खत एका शेतकऱ्याला एका महिन्यात जास्तीत जास्त ५० बॅगा खरेदी करता येईल.तसेच प्रत्येक जिल्ह्यातील जास्त खत खरेदी करणाऱ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना तयार करण्यास सांगितले आहे. देशात युरिया, डीएपी, एमओपी आणि संयुक्त खतांची पुरेशी उपलब्धता आहे असे त्या म्हणाल्या..डीएपीचा वापर कमी झालाएप्रिल ते जून या तिमाहीत युरिचा वापर १२ टक्क्यांनी वाढून जवळपास ७० लाख टनांवर गेला. तर एमओपी खतांचा वापर तब्बल ४७ टक्क्यांनी वाढून साडेचार लाख टनांवर पोहोचला. संयुक्त खतांचा वापरही ३४ टक्क्यांनी वाढून ३० लाख ५२ हजार टन झाला आहे.परंतु देशात डीएपीचा वापर जवळपास १७ टक्क्यांनी कमी झाल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून दिसते. या तिमाहीत १६ लाख टन डीएपी खतांचा वापर झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र देशात खत टंचाईच्या सर्वाधिक तक्रारी डीएपीच्या होत्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.