major thomas candy
sakal
लिखित भाषेत शब्दांचा अर्थ योग्य पद्धतीने पोहोचवण्यासाठी महत्त्वाची असतात ती विरामचिन्हे. एखाद्या वाक्यात चुकीच्या जागी टाकलेला स्वल्पविराम संपूर्ण अर्थाचा अनर्थही करू शकतो, असे विरामचिन्हांचे अनन्यसाधारण महत्त्व.
मराठी भाषेत अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून विरामचिन्हांच्या वापरास प्रारंभ झाला. याची सुरुवात करणारी व्यक्ती कोणी मराठमोळी, भारतीय नव्हे; तर चक्क ब्रिटिश आहे. त्यांचे नाव आहे मेजर थॉमस कँडी.