

- प्रज्वल रामटेके
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या भरतीत मागील दोन वर्षांत १९६ जागा रिक्त राहिल्याचे समोर आले आहे. या पदासाठी प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, मुख्य परीक्षेनंतर शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी आता उमेदवारांकडून केली जात आहे.