‘पर्वतीतील २६ कुटुंबे पुनर्वसनास अपात्रच’

Shekhar-Gaikwad
Shekhar-Gaikwad

पुणे - आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामध्ये पर्वती येथील सर्व्हे नंबर १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथील २६ कुटुंबांना पुराचा फटका बसला होता. परंतु ही कुटुंबे प्रकल्पग्रस्त नाहीत, त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करता येणार नाही, असे पत्र आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले. 

पाच महिन्यांपूर्वी पुण्यात अतिवृष्टी झाली होती, तेव्हा आंबिल ओढ्याला पूर आला होता. त्याचा फटका हजारो नागरिकांना बसला. पर्वती येथील सर्व्हे नंबर १३५ फायनल प्लॉट क्रमांक २८ येथे पुरामध्ये २६ कुटुंबांच्या घरांचे नुकसान झाले होते. त्यावर जी कुटुंबे पुरामध्ये बाधित झाली आहेत, त्यांचे आठवड्यात जवळच्या सदनिकांमध्ये पुनर्वसन करावे. महापालिकेच्या गाळा वाटप नियमावलीत आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांना सध्या समाविष्ट करण्यास तसेच सरकारची मान्यता मिळेल, या भरवशावर आठवड्यात पुनर्वसन करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असा ठराव स्थायी समिती आणि सर्वसाधारण समितीने केला होता. त्या ठरावावर आयुक्तांनी शहर सुधारणा, स्थायी समितीमार्फत सर्वसाधारण सभेला पत्र पाठविले आहे. त्यामध्ये पुरामध्ये बाधित कुटुंबे प्रकल्पग्रस्त नाहीत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करता येणार नाही, असे या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com