MP Dr. Amol Kolhe
sakal
जुन्नर - माळशेज भोरांडे प्रकल्पासारखे एकूण 59 प्रकल्प आगामी काळात राज्यात प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांमधून ऐंशी हजार मेगा वॅट एवढी वीज निर्मितीची क्षमता आहे. आगामी 2030 मध्ये महाराष्ट्राला एवढ्या ऊर्जेची गरज देखील भासणार नसल्याने हे प्रकल्प सह्याद्रीवर लादण्याची गरज काय असा सवाल शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केला. जुन्नर येथे अंजनावळे येथे प्रस्तावित असलेल्या अदानी जलविद्युत प्रकल्पाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. कोल्हे यांनी हा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी डॉ. कोल्हे यांनी चित्रफितीद्वारे प्रकल्पाचे धोके स्पष्ट केले.