पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांत ६१.४२ टीएमसी पाणीसाठा

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६१.४२ टीएमसीने वाढ झाली आहे.
Khadakwasla dam water storage
Khadakwasla dam water storagesakal
Updated on
Summary

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६१.४२ टीएमसीने वाढ झाली आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांमधील एकूण पाणीसाठ्यात गेल्या १४ दिवसांत तब्बल ६१.४२ टीएमसीने वाढ झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व धरणांतील मिळून एकूण पाणीसाठा आता ७८.३१ टीएमसी इतका झाला आहे. हाच पाणीसाठा १४ दिवसांपूर्वी म्हणजेच ३० जून २२ रोजी अवघा १६.८९ टीएमसी इतका अल्प झाला होता. दरम्यान, धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या वर्षीच्या याच तारखेपर्यंतच्या एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा ३८.७० टीएमसी इतका पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत सर्व धरणांत मिळून एकूण ३९.६१ इतका पाणीसाठा उपलब्ध होता. दरम्यान, खडकवासला, कलमोडी, आंद्रा ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. जूनच्या अखेरीस पिंपळगाव जोगे, मुळशी, टेमघर आणि नाझरे ही चार धरणे कोरडी पडली होती. शिवाय उजनीतील उपयुक्त पाणीसाठा शून्यावर आला होता, असे जलसंपदा विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरणसाठा आकडेवारी अहवालातून उघडकीस आले आहे.

जिल्ह्यात एकूण २६ धरणे आहेत. यामध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा क्षमता ही २१७.८६ टीएमसी इतकी आहे. यापैकी गेल्या वर्षभरात २००.९७ टीएमसी पाणी वापरले गेले होते, असेही या अहवालातून स्पष्ट झाले होते.

‘खडकवासला’त ५० टक्के पाणीसाठा

खडकवासला, ता. १४ : खडकवासला धरण साखळीतील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा ५० टक्के झाला आहे. दरम्यान, पानशेत व वरसगाव ही धरणेही पन्नास टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून बुधवारी रात्री १३ हजार क्युसेक पाणी सोडले जात होते. ते गुरुवारी सकाळी सहा वाजता चार हजार ७०८ क्युसेकपर्यंत कमी केले. मात्र, दिवसभर हा विसर्ग सुरू होता. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपेक्षा आज पावसाचा जोर निम्म्याने कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने धरणातील पातळीतदेखील तेवढ्याच प्रमाणात येवा (आवक) कमी झाली. चारही धरणांत मिळून १४.६८ टीएमसी म्हणजे ५०.३५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.

प्रमुख धरणांतील शिल्लक पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

माणिकडोह - ३.९९

येडगाव - १.६३

वडज - ०.६८

डिंभे - ४.३०

चासकमान - ५.१८

भामा आसखेड - ५.०८

आंद्रा - २.९२

पवना - ४.३४

वरसगाव - ५.८२

पानशेत - ५.१३

खडकवासला - १.९४

गुंजवणी - २.२४

भाटघर - ९.७६

वीर - ७.५२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com