भावना व तंत्रज्ञानाची सांगड हवी - अजित भोसले

Ajit-Bhosale
Ajit-Bhosale

पुणे - ‘लष्कराचे भविष्यातील नेतृत्व करणाऱ्यांनी मानवी भावभावना आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांची सांगड घालणे आवश्‍यक आहे. कारण, काश्‍मीरीयत समजून घेण्याची प्रक्रिया मानवविद्या शाखेतून तर, बालाकोटमध्ये वापरलेल्या गाइडेड बाँबचा अभ्यास तंत्रज्ञानातून साध्य करता येतो,’’ असे मत एअर मार्शल अजित भोसले यांनी व्यक्त केले. 

‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या (एनडीए) १३६व्या तुकडीच्या पदवीप्रदान समारंभात ते बोलत होते. या वेळी ‘एनडीए’चे प्रमुख एअरमार्शल आय. पी. विपिन, उपप्रमुख रिअर ॲडमिरल ए. के. ग्रेव्हाल आणि प्राचार्य प्रा. डॉ. ओमप्रकाश शुक्‍ला आदी उपस्थित होते.

‘एनडीए’या तुकडीतून २९१ विद्यार्थ्यांनी पदवी प्रदान करण्यात आली. यात कला शाखेतील ९०, विज्ञान शाखेच्या ५५, संगणक विज्ञान शाखेच्या ११४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यात सात मित्रराष्ट्रांचे विद्यार्थीही आहेत. यंदा ‘एनडीए’तून ‘बी. टेक’ची पहिली तुकडी बाहेर पडली. यातील पहिल्या सहा सत्रांमध्ये डी. एस. देव याने प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर विज्ञान शाखेत पहिला क्रमांक मिळविलेल्या खिलानंद साहू, संगणक विज्ञानमधील शिबू चौहान आणि आशिषकुमार यांनी कला शाखेतून पहिल्या क्रमांक 
मिळविला.

भोसले म्हणाले, ‘‘मानवी भावभावना संवेदनशिलतेने हाताळण्याचे कौशल्य विकसित करताना, वेगाने बदलणारे अद्ययावत तंत्रज्ञानही तत्परतेने आत्मसात करण्याची कला ‘एनडीए’च्या अभ्यासक्रमातून तुम्हाला मिळते. काश्‍मीरसारखी तणावाची स्थिती हाताळताना काश्‍मिरीयत समजून घेणे हा जसा मानव्यविद्या शाखेचा भाग आहे, त्याचबरोबर बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये वापरलेल्या गाइडेड बाँबमधील तंत्र आत्मसात केले पाहिजे.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com