

वाळुंजनगर ता. आंबेगाव : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांमुळे फुले खराब झाली आहे. खराब फुलांना बाजारभाव मिळत नसल्याने तरुण शेतकरी जयेश वाळुंज यांनी तोडायला आलेले दीड एकर क्षेत्रातील झेंडूचे पिक अक्षरशा कोयत्याने तोडून टाकले आहे.
Sakal
पारगाव : आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झेंडू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारांमुळे पिकाची वाढ थांबून फुले खराब झाली आहे. झेंडूला सध्या बाजारभाव कमी मिळत होता त्यातच खराब फुलांना बाजारभाव मिळत नसल्याने व्यापारी फुले घेत नसल्याने वाळुंजनगर येथील कृषी पदवीधर तरुण शेतकरी जयेश तान्हाजी वाळुंज यांनी तोडायला आलेले दीड एकर क्षेत्रातील झेंडूचे पिक अक्षरशा कोयत्याने तोडून टाकले आहे.