

आंबेठाण - एमआयडीसीच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थित आणि सुरळीत व्हावी यासाठी नूतनीकरण करण्यात आलेला चाकण ते वासुली फाटा रस्ता (ता. खेड) प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील आंबेठाण ते वराळे यादरम्यान मागील दहा दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाले आहे. यात कामगारवर्गाचे प्रमाण जास्त आहे.