

MSRTC buses travelling to Pandharpur will also receive toll exemption during the Ashadhi pilgrimage period.
Sakal
आळंदी : आषाढी वारी काळामध्ये 6 जुलै ते 29 जुलै या कालावधीत राज्यभरातून येणाऱ्या दहा मानाच्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांच्या हलक्या-जड वाहनांसाठी टोल नाक्यांवर सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळाच्या वतीने पत्रकाद्वारे सूट देत टोलमाफी देण्यात आली आहे. हा आदेश 6 जुलै रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने उपसचिव निरंजन तेलंग यांनी काढला आहे.