
पंढरपूर : टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष करीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यांसह सकल संतांच्या पालखी सोहळ्यांसह आलेल्या लाखो वारकऱ्यांनी पंढरीत प्रवेश केला. नाचत, गात आपली वारी विठुरायाच्या चरणी रुजू होणार असल्याने वैष्णवांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. पालखी सोहळ्यात विक्रमी संख्येने वारकरी दाखल झाल्याने अवघी पंढरी भक्तिरसात न्हावून निघाली.