

पुणे - ‘त्या’ निरागस बाळाला जन्मतःच अर्धीच अन्ननलिका होती. तोंडापासून सुरू झालेली अन्ननलिका मध्येच तुटली होती. अन्ननलिकेचे दुसरे टोक पोटापर्यंत पोहोचत श्वसनलिकेला जोडले गेले होतो. त्यामुळे इवल्याशा जिवावर जन्मल्यानंतर काही तासांमध्ये शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्यायच नव्हता. त्यामुळे पुण्यातील वैद्यकीय तज्ज्ञांनी तुटलेली अन्ननलिका जोडली आणि बाळाची आयुष्यरेषा वाढली.