
पुणे : अंतीम वर्षातील विद्यार्थ्यांचे पूर्वीच्या सत्रातील विषय बॅकलाॅग राहिले आहेत, त्यासंदर्भात काय करायचे आहे यासाठी शासन युद्धपातळीवर चर्चा करत आहे. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे याबाबतही योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.
राज्य सरकारने अंतीम वर्षाची परीक्षा रद्द केल्याचा निर्णय घेतला असला तरी अनेक विद्यार्थ्यांचे पूर्वीच्या सत्र/वर्षाचे विषय बॅकलाॅक राहिल्याने आपल्याला पदवी मिळणार की नाही यावरून चिंता वाढली आहे. राज्यात सुमारे तब्बल साडे तीन लाखापेक्षा जास्त ( ४५ टक्के)तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुमारे ७५ हजार (३० टक्के) बॅकलाॅक लागलेले विद्यार्थी आहेत.
या विद्यार्थ्यांनीही आम्हाला ही 'कमीत कमी गुणांवर पास' या निकषावर गुण देऊन बॅकलाॅगच्या विषयांमध्ये पास करावे, आम्हाला मे महिन्यात परीक्षा देता आली नाही, त्यामुळे आमची बॅकलाॅग काढण्याची एक संधी गेली आहे, त्याचा ही विचार करावा, अशी मागणी लावून धरली आहे. दरम्यान, भाजपचे अामदार आशिष शेलार यांनीही व्हिडिओद्वारे सरकारच्या परीक्षा रद्दच्या निर्णयावर टीका करत "राज्यातील ४० टक्के विद्यार्थ्यांचे बॅकलाॅग आहेत हे विद्यार्थी ही अंतिम वर्षात नापास होणार का? असा प्रश्न उपस्थित केले आहेत.
याबाबत उदय सामंत यांनीही ट्विटरवर व्हिडिओ टाकून भूमिका स्पष्ट केली. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला, पण यानंतर बॅकलाॅग असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, तर काही जण तो निर्माण करत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभाग बॅकलाॅगच्या विद्यार्थ्यांसाठीचा निर्णय योग्य वेळी जाहीर केला जाईल. यासाठी युद्धपातळीवर विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांनी कोणतीही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन ही सामंत यांनी केले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
"राज्यातील लाखो विद्यार्थी संभ्रमात असताना सत्ताधारी व विरोधक यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मात्र यावर सरकारने योग्य वेळ कोणती हे सांगून लवकर निर्णय जाहीर करावा, अशी मागणी, मासूचे अध्यक्ष अॅड. सिद्धार्थ इंगळे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.