
बारामती : काटेवाडीतील तीनशेहून अधिक शेतक-यांचा वीजपुरवठा आज सकाळी अचानकच खंडीत केल्याने संतप्त शेतक-यांनी महावितरणच्या अधिका-यांना याचा जाब विचारला. वीजबिले भरली नसल्याने हे पाऊल उचलल्याचे अधिका-यांनी सांगितले असले तरी अनेक शेतक-यांनी अजून बिलेच मिळालेली नसल्याचे सांगत महावितरणच्या टोकाच्या पावलाचा निषेध केला. काही काळ तणावपूर्ण वातावरण बनल्यानंतर महावितरणच्या अधिका-यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्याची ग्वाही दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.
कालपासून काटेवाडी परिसरातील तीसहून अधिक रोहित्रांचा वीजपुरवठा शेतक-यांनी बिलच अदा केलेले नाही असे कारण सांगत महावितरणने खंडीत केला होता. आज सकाळी शेतक-यांना याची माहिती मिळाल्यानंतर शेतक-यांनी महावितरणच्या अधिका-यांकडे धाव घेत याचा जाब विचारला.
अनेक शेतक-यांनी आपल्याला अद्याप बिलेच मिळाली नाहीत तर भरायची कोठून असा सवाल केला. अधिका-यांनी बिले दिलेली असल्याचा दावा केला मात्र शेतक-यांनी बिलेच मिळाली नसल्याची भूमिका मांडली. दोन बिलांपैकी एक बिल भरण्याची तयारी बहुसंख्य शेतक-यांनी या वेळी दाखविल्यानंतर अधिका-यांनी वीजपुरवठा पुन्हा पूर्ववत केल्यानंतर हा तणाव निवळला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.