बारामती : युध्द प्रत्यक्ष भारतीय भूमीवर होत नसले तरी त्याच्या झळा आता ग्रामीण जनजीवनाला प्रत्यक्षपणे बसू लागल्या आहेत. गॅसटंचाईमुळे इलेक्ट्रीक शेगडयांचा वाढलेला वापर ग्रामीण जीवनावर परिणाम करणारा ठरला आहे. .राज्यात एकीकडे गॅसटंचाई व दुसरीकडे वाढत्या उन्हामुळे पंखे, कूलर्स व एअरकंडीशनर्सचा वापर अचानक वाढल्याने दररोज संध्याकाळी वीजेचा अतिरिक्त वापर होऊ लागल्याने यंत्रणा कोलमडून जाऊ नये या उद्देशाने महावितरणच्या वतीने कृषी फीडरवरची वीज संध्याकाळी सहा ते रात्री दहा अशी चार तास बंद ठेवली जात आहे..Latest Marathi News Update: आज कुठे काय घडलं? वाचा एका क्लिकवर....सलग पाच दिवस चार तास कृषी फीडरवरील वीजपुरवठा बंद ठेवून राज्यातील वीजपुरवठयाची यंत्रणा योग्य रितीने कार्यान्वित राहावी या साठी महावितरण कडून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती महावितरणच्या उच्चपदस्थांनी दिली..काही गावातील घरांचाही वीजपुरवठा कृषी फीडरवर असल्या कारणाने अशा घरांनाही या वीजपुरवठा बंदचा फटका सहन करावा लागत आहे, तर काही गावेच अशा फीडरवर असल्याने या गावांनाही भर उन्हाळ्यात संध्याकाळी सहा ते रात्री दहा पर्यंत अंधारातच राहावे लागत आहे. याचा शेतीपूरक व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ लागल्याचे चित्र आता निर्माण होऊ लागले आहे..या काळात कृषीपंप सुरु झाल्यास त्याचा ताण वीजवहन यंत्रणेवर येऊन सगळीच यंत्रणा कोलमडून पडण्याची भीती महावितरणला असल्याने गेले काही दिवस दररोज संध्याकाळी वीजपुरवठा बंद ठेवला जात आहे..दरम्यान उपलब्ध माहितीनुसार बारामती परिमंडळात बारामती विभागासह सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्याचा काही भाग समाविष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार या परिमंडळातील सर्वच कृषी फीडरवरील वीजपुरवठा दररोज चार तास बंद ठेवला जात आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीही वीजपुरवठा अखंडीत असावा या साठी महावितरण्याच्या मुख्य अभियंत्यांना पत्र दिले आहे.. गँसटंचाईमुळे संकट गडद झाल्याची शक्यता...राज्यात गॅसटंचाईने इलेक्ट्रीक शेगडयांचा वाढलेला वापर संध्याकाळी अधिक वीज खेचून घेत असल्याने यंत्रणा शाबुत राहावी या साठी हा उपाय करण्याशिवाय सध्या महावितरणकडे पर्यायच नसल्याने सांगितले गेले. उष्णता वाढल्याने एकीकडे थंडाव्यासाठी व दुसरीकडे पिके जगविण्यासाठी वीजेचा वापर वाढल्याने त्याचा ताण यंत्रणेवर येत आहे..ग्रामस्थ हवालदिल....ज्या कृषी फीडरवर ज्या ग्रामस्थांचा वीजपुरवठा आहे त्यांना सलग पाच दिवस चार तास वीजपुरवठा बंदला सामोरे जावे लागत असल्याने लोक हवालदिल आहेत. ऐन उन्हाळ्यात सहा ते दहा चार तास वीजच नसल्याने उकाडयाने लोक हैराण होत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.