Pune : भीमाशंकरला साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे दाेन पुरस्कार जाहीर

भीमाशंकरला साखर कारखान्याला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा 'उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३' व 'तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार' जाहिर
bhimashankar sugar factory get two award best finance management and technology
bhimashankar sugar factory get two award best finance management and technology Sakal

पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ( मांजरी बुद्रुक) यांचा सन २०२२-२३ करीता मध्य विभागातील प्रथम क्रमांकाचा “उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३” व मध्य विभागातील द्वितीय क्रमांकाचा “तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार” जाहीर झाला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

राज्यातील २०२२-२३ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत देण्यात येणा-या पुरस्काराची काल शुक्रवारी घोषणा करण्यात आली पुरस्काराचे वितरण गुरुवार (दि.११) रोजी सकाळी साडेदहा वाजता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी केंद्रीय कृषीमंत्री व संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.

पुरस्कार प्राप्त झाल्याबाबत अधिक माहिती देताना श्री. बेंडे म्हणाले की राज्याचे सहकार मंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साखरेचा प्रति क्विंटल रोखीचा उत्पादन प्रक्रिया खर्च तसेच एकूण उत्पादन प्रक्रियेचा खर्च व खेळते भांडवलावरील व्याजाचा खर्च राज्याच्या सरासरी खर्चापेक्षा कमी आहे.

इतर कारखान्याच्या तुलनेत स्टोअर खरेदी व्यवस्थापन चांगले असल्याने उत्कृष्ठ आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार २०२२-२३ करिता निवड झाली आहे.

तसेच मिलमधील ऊसाचा तंतुमय निर्देशांक, रिड्युस्ड मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा व विजेचा कमीत कमी वापर, साखर उत्पादन प्रक्रीयेमध्ये बगॅस वापर कमी आहे. गाळप क्षमतेचा वापर योग्य प्रकारे करून बगॅस बचत, साखरेच्या व्ययामध्ये घट व देखभाल दुरुस्ती खर्चात काटकसर केल्याने तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

सदर पुरस्कार प्राप्त होणेस कारखान्याचे संस्थापक, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचा-यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक शेतकरी व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे.

कारखान्यास देश पातळीवरील १२ व राज्य पातळीवरील १४ असे एकूण २६ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार ५ वेळा प्राप्त करणारा एकमेव कारखाना ठरला असल्याचे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com