
पुणे : त्या’ तिघांची दृष्टी नियतीने जन्मतः हिरावून घेतली, तरी, त्यांच्यातील दुर्दम्य इच्छाशक्ती कमी झालेली नव्हती. त्याच जोरावर तिघांनीही गावाला निरोप देऊन शिक्षणासाठी पुण्याची वाट धरली. वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिक्षण घेताना, एरवी हातात हात घालून, एकमेकांना खंबीर साथ देत बसने फिरणारी ही मित्रमंडळी शुक्रवारी पुण्यातील रस्त्यांवर अगदीच बिनधास्त फिरत होती, त्यांना ना गर्दीची भीती होती, ना वाहनांमुळे अपघात होण्याची. कारण, तिघेही पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या मेळ्यात आनंदाने सहभागी होत, काही किलोमीटर पायी चालून विठ्ठल चरणी सेवा रुजू करत होते.