Book Launch Event: ब्रिटिश साम्राज्यवादामुळे चीनमध्ये टागोरांविरोधात ‘गो बॅक’चा नारा; सतीश बागल यांचे विश्लेषण ; ‘चीन भेटीतील भाषणे’ पुस्तकाचे प्रकाशन

टागोरांच्या विश्वबंधुत्वाच्या विचारांना चीनमध्ये ‘गो बॅक’चा विरोध; ब्रिटिश साम्राज्यवादामुळे निर्माण झालेल्या ऐतिहासिक कटुतेचा सतीश बागल यांनी केला ऊहापोह
The remarks were made during the launch of the Marathi book 'China Bhetitil Bhashane: Rabindranath Tagore' in Pune.

The remarks were made during the launch of the Marathi book 'China Bhetitil Bhashane: Rabindranath Tagore' in Pune.

Sakal

Updated on

पुणे : ‘‘विवेकवाद, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या रवींद्रनाथ टागोर यांनी आयुष्यभर ‘अतिराष्ट्रवादाला’ विरोध केला आणि जागतिक बंधुभावाची भूमिका मांडली. मात्र, १९२४ मध्ये चीन दौऱ्यावर गेलेल्या टागोरांना तेथील तरुणांकडून ‘गो बॅक’च्या घोषणांचा सामना करावा लागला. हा विरोध त्यांच्या विचारांमुळे नव्हे, तर ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणांमुळे भारताविषयी चीनमध्ये निर्माण झालेल्या ऐतिहासिक कटुतेतून उद्‌भवला होता,’’ असे मत माजी सनदी अधिकारी आणि लेखक सतीश बागल यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com