पारगाव - बॉयलर जिवंत कोंबड्यांना मागणी जास्त त्या तुलनेने उन्हाळ्यातील तीव्र उष्णतेमुळे बॉयलर जिवंत पक्षांच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. परिणामी बाजारात दरवाढ होऊन प्रती किलोला १५० रुपयांपर्यंत उच्चांकी दर मिळत आहे..त्यामुळे मागील काही वर्ष तोट्यात असलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला असुन मागील दोन तीन वर्षात झालेला तोटा भरून निघून चांगले उत्पन्न मिळत आहे. चिकनच्या दरात मोठी वाढ झाल्याने मांसाहारी खवय्यांना चिकनवर ताव मारताना हात आखडता घ्यावा लागत आहे.मागील दोन तीन वर्षापासून बॉयलर कोंबडीच्या पोल्ट्री उद्योगामध्ये जीवंत कोंबडीला मिळणाऱ्या दरात मोठी घसरण झाली होती. उत्पादन खर्च वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे या व्यवसायातील मंदी दीर्घकाळ टिकून राहिल्याने अनेक व्यावसायिकांनी व्यवसाय बंद करून शेड रिकामे ठेवणे पसंत केले..सध्या उन्हाळ्यातील तीव्र उष्णता यामुळे बॉयलर कोंबड्यांची वाढ खुंटल्याने कोंबड्यांचे वजन नियंत्रित राहिले आहे. त्यामुळे जिवंत पक्षांच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे, परिणामी बाजारात दरवाढ होऊन उच्चांकी दर मिळत आहेत.मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडून दर सुधारले आहेत. एक ते दीड महिन्यापूर्वी जिवंत कोंबड्यांचे दर प्रती किलो ११५ ते १२० रुपयांच्या आसपास होते. आता तेच दर प्रती किलो १४५ ते १५० पर्यंत आहे. उत्पादन खर्च प्रती किलोसाठी १०० ते १०५ रुपये येत आहे त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना चांगले उत्पन्न मिळत आहे..तर दुसरीकडे जिवंत कोंबडीचे दर वाढल्याने चिकनच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चिकनचे प्रती किलोचे दर २६० ते २८० रुपयांवर गेले आहे. तेच दर दीड महिन्यापूर्वी प्रती किलो २०० ते २२० रुपये होते. अशी माहिती अवसरी खुर्द येथील चिकनचे विक्रेते बाबु मनियार यांनी सांगितले.बॉयलर जिवंत कोंबड्यांच्या व्यवसायात मागील दोन तीन वर्षात मंदी जास्त काळ राहिली. त्याचा परिणाम अनेकांनी पोल्ट्री व्यवसाय बंद केला. त्यामुळे उन्हाळा तसेच रमजान ईद व रोजाचे उपवास यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळे बॉयलर जिवंत कोंबड्यांना चांगला दर मिळत आहे. उन्हाळा संपेपर्यंत दर असाच टिकून राहील असे सांगितले.- डॉ. प्रसन्न पेडगावकर (महाव्यवस्थापक - वेकिंज).मागील दोन तीन वर्षापासून बॉयलर कोंबडीच्या पोल्ट्री उद्योगामध्ये जीवंत कोंबडीला मिळणाऱ्या दरात मोठी घसरण झाली होती. उत्पादन खर्च वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता. उन्हाळा असुनही कोंबड्यांना मिळणाऱ्या उच्चांकी दरामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना दिलासा मिळाला असुन, मागील दोन तीन वर्षात झालेला तोटा भरून निघून चांगले उत्पन्न मिळत आहे.- प्रमोद हिंगे (संस्थापक - संचालक, ऊर्जा फुड्स अँड ऍग्रो प्रा. लि., मंचर).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.