
पुणे - 'विद्यमान सरकारच्या मंत्रीमंडळात डाग लागलेले मंत्री आहेत. ६५ टक्के मंत्र्यांवर खुन, भ्रष्टाचारासह वेगवेगळे आरोप आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारच, त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत, ते केवळ आरोप नाहीत तर वस्तुस्थिती आहे. सरकारला जनाची नसेल, तर मनाची लाज बाळगुन सरकारने डाग लागलेल्या मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ घ्यावेत.' अशी टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी राज्य सरकारवर केले.