Water Supply
पुणे - पुणे शहरात समाविष्ट झालेली १२ गावे शुद्ध पाण्याची चातक पक्षाप्रमाणे वाट बघत असून, या गावांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ‘अर्बन चॅलेंज फंड’अंतर्गत समाविष्ट गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी ८९० कोटी रुपये तर शहरातील पूरस्थिती टाळण्यासाठी तब्बल ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आज (ता. ११) दिल्ली येथे झालेल्या ऍपेक्स समितीच्या बैठकीत या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली.