

The Indrayani River has turned foamy again ahead of Ashadhi Wari, raising serious health concerns for thousands of Warkaris visiting Alandi.
Sakal
आळंदी : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला अवघे सहा दिवस उरले आहेत. मात्र आज सकाळी पिंपरी-चिंचवड हद्दीतून मोठ्या प्रमाणात जलपर्णी सोडण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास रसायनयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे आळंदीतील इंद्रायणी नदी सायंकाळनंतर रात्रभर साबणाच्या पाण्याप्रमाणे फेसाने तरंगताना दिसत होती. ऐन वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी जलप्रदूषणाने मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे.