

- सुनील जगताप
उरुळी कांचन - उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभारामुळे सुमारे ९९० बालके आधार कार्ड पासून वंचित. उरुळी कांचन ग्रामपंचायत परिसरातील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये २०२४ साली जन्म घेतलेल्या बालकांच्या जन्माची नोंद ग्रामपंचायतच्या तत्कालीन कर्मचाऱ्याकडून प्रलंबित ठेवण्याने व आता त्या पोर्टलवरून नोंद करून देता येत नसल्याने शासनाच्या नवीन धोरणाला अनुसरून आधार कार्ड नोंदणीसाठी क्यू आर कोड असलेला जन्म दाखलाच ग्राह्य धरण्यात यावा.