पुणे - रिमझिम बरसणाऱ्या पावसाच्या धारांमध्ये चिंब भिजत बराचवेळ गाण्यांवर थिरकणारे हजारो तरूण 'त्या' एका क्षणाला थांबले. 'गोविंदा आला रे आला', 'अरे बोल बजरंग बली की जय'चा जयघोष करत पथकांनी कडक सलामी दिली. त्यानंतर आला तो, श्वास रोखून धरणारा क्षण. एकावर एक असे गोविंदा पथकांचे सहा ते सात थर चढू लागले.