नक्की कोणत्या भाषेत सांगितल्यावर यांना समजेल... 

quarantine
quarantine

वालचंदनगर (पुणे) : पुणे, मुंबईमधून इंदापूर तालुक्‍यातील अंथुर्णे परिसरामध्ये आलेले 11 नागरिक विलगीकरणाचे नियम न पाळता बिनधास्तपणे गावामध्ये फिरत आहेत. त्यामुळे 4 घरमालक व बाहेरगावच्या 11 नागरिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंथुर्णे येथील आपत्ती व्यवस्थापन समितीने पोलिसांकडे केली आहे. 

पुणे व मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णाच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे या शहरी भागातून ग्रामीण भागाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. अंथुर्णे परिसरामध्ये मुंबई- पुण्यामध्ये राहणारे 11 नागरिक आले आहे. त्यांना 4 घरमालकांनी आसरा दिला आहे.

संबधित नागरिकांना अंथुर्णे येथील ग्रामसेवक, तलाठी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळावेळी विलगीकरणाचे नियम सांगून घरामध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र, संबधित नागरिक प्रशासनाच्या सुचनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन संपूर्ण गावामध्ये बिनधास्त फिरत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. संबधित नागरिक व घरमालकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ग्रामसेवक दीपक भोसले, तलाठी मिलिंद हगारे यांनी वालचंदनगर पोलिसांकडे केली आहे. 

यासंदर्भात वालचंदगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी सांगितले की, संबधित नागरिकांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com