
पुणे : पानशेत पुराच्या दुर्घटनेतील पूरग्रस्त सोसायट्यांना जमीन मालकीहक्काने करून घेण्यासाठी दिलेली तीन वर्षांची मुदत संपुष्टात आली आहे. या मुदतीत १०३ पैकी केवळ अकरा सोसायट्यांना हक्क प्राप्त झाला आहे. दरम्यान, ही मुदत आणखी वाढवावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे.