tejasvi surya
sakal
पुणे - ‘सध्या महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयकाच्या प्रस्तावानुसार देशभरात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा वाढवण्याचा विचार आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या २४ जागा वाढू शकतात. जर २०२७ च्या जनगणनेनंतर पुनर्रचना झाली, तर महाराष्ट्रात केवळ एकच जागा वाढेल,’ असा दावा भाजप खासदार व युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केला.