
औंध (पुणे) : बालेवाडी येथील निकमार महाविद्यालयाच्या वसतीगृहात सुरू केलेल्या विलगीकरण कक्षात सुविधा उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत हा कक्ष बंद करण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नगरसेविका ज्योती कळमकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
नगरसेविका कळमकर यांनी पालकमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. नुकतेच एका वयोवृध्द रूग्णाने येथील सुरक्षाव्यवस्था भेदून येरवडा येथे पलायन केले होते. त्यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होत असुन, याबरोबरच विलगीकरण केलेल्या रूग्णांच्या जेवणाचेही हाल होत आहेत.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
या विलगीकरण कक्षात साधारणपणे सातशे संशयित व कोरोनाग्रस्तांना ठेवण्यात आले आहे. त्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. येथील सुविधांची पुर्तता होत नाही तोपर्यंत, तसेच बाणेर, बालेवाडी, पाषाण, सोमेश्वरवाडी येथील नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे विलगीकरण कक्ष तत्काळ बंद करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.