

"अशुद्ध पाण्याचे संकट टळणार!" जीबीएसच्या धास्तीनंतर महापालिका ॲक्शन मोडवर; पावसाळ्याआधी डीएसके विश्वमध्ये येणार शुद्ध पाणी.
sakal
पुणे : अशुद्ध पाण्यामुळे ग्युलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने धायरी, खडकवासला परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे या भागाला शुद्ध पाणी पुरवठा करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने समान पाणी पुरवठा योजनेतून डीएसके विश्व भागाल शुद्ध पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.