दिवाळीत मुलांची भेट अधांतरी; ताबा न मिळण्याची अनेक पालकांना भीती

Divorced parents fear not getting custody of their children during Diwali holidays
Divorced parents fear not getting custody of their children during Diwali holidays

पुणे :''दिवाळीच्या सुटीत माझी 12 वर्षांची मुलगी दरवर्षी किमान आठ दिवस माझ्याकडे रहायला येते. मी व माझ्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना तिचा सहवास मिळाल्याने दिवाळी सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. पण यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तिची आई मुलीला माझ्या घरी पाठविण्यास तयार नाही. आम्ही सर्व काळजी घेऊ असे तिला पटवून दिले आहे. मुलीची पण येण्याची इच्छा आहे. मात्र तरीही तिची आई मुलीला पाठवायला तयार नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी मुलीविना साजरी होणार की काय, याच दुःख राकेश यांना आहे.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राकेश आणि लता यांचा 2016 साली घटस्फोट झाली असून मुलगी पूजाचा (सर्व नावे बदललेली) ताबा आईकडे आहे. उन्हाळा आणि दिवाळीच्या सुटीत ती किमान आठ दिवस राकेश यांच्या घरी येते. या वर्षी मात्र त्यात खंड पडेल की काय, अशी भीती त्यांच्या मनात आहे. मुलांची सुरक्षितता, पोटगी मिळाली नाही म्हणून आणि ताबा नसलेल्या पालकांना मुद्दाम त्रास देण्यासाठी सध्या मुलांची भेट नाकारली जात आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्ताने मिळणाऱ्या मुलांच्या सहवासाला यंदा मुकावे लागणार, असल्याचे दुःख राकेश यांच्यासह अनेक पालकांच्या मनात आहे.

मुलांचा ताबा मिळण्यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात दरवर्षी सुमारे 350 दावे दाखल होतात. त्यातून सर्वाधिक दावे हे दिवाळीच्या निमित्ताने केलेले असतात. काही क्षणांपुरती भेट होत आलेली मुलं आपल्या घरी यावी, मुलांना दुसऱ्या पालकांचा सहवास मिळावा व एकमेकांच्या आयुष्यातील सुख-दुखःचे क्षण कळावे हा त्यामागील उद्देश. मात्र या सर्वांवर यंदा पाणी फिरण्याची चिन्हे आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

व्हिडिओ कॉलचाच सहारा 
दिवाळीत मुलांचा ताबा मिळणारच नाही, याची खात्री पटलेल्या पालकांना आता व्हिडिओ कॉलचाच आधार असणार आहे. त्यामुळे मला मुलांबरोबर व्हिडीओ कॉलद्वारे बोलूद्या असा आग्रह ताबा असलेल्या पालकांकडे वाढला आहे. मात्र काही पालक तर व्हिडिओ कॉलवर देखील बोलून देत नाहीत. त्यामुळे त्यावरून पालकांमधील वाद देखील वाढत आहेत.

ताबा नसलेल्या पालकाला मुलांची भेट देणे हा त्या मुलांचा व पालकांचा न्यायिक अधिकार आहे. या सर्वांचा मुलांवर देखील परिमाण होतो. त्यांच्या मनस्थितीचा विचार करायला हवा. त्यामुळे भेटीबाबत दोघांनी सामंजस्याने निर्णय घ्यावा. इतर ठिकाणी भेटणे शक्‍य नसेल तर घरी किंवा पार्किंगमध्ये भेटावे. कारण ते तिघांच्याही हिताचे आहे. त्यातून न्यायालयाच्या आदेशाचा देखील आदर होईल. तसेच भेट घेताना कोरोना विषयक सर्व खबरदारी घ्यावी, त्यातून कोणाच्याही आरोग्याला धोका होणार नाही.
- ऍड. स्मिता देशमुख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com