
महिलांची मालकी असलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) अभूतपूर्व वाढीमुळे भारताच्या उद्योजकीय क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत. महिलांच्या नेतृत्वाखालील हे उपक्रम एमएसएमई क्षेत्राला केवळ नवा आयामच प्रदान करत नाहीत तर, देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासाबरोबरच आर्थिक वृध्दीमध्येही महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.