
पुणे : राज्यातील जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त पदांच्या शंभर टक्के भरतीसाठी काँग्रेस आणि इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पदभरतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य असून, आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.