

Dr Rajendra Shende said that meaningful environmental change can only be achieved through active participation of young people and communities.
Sakal
पुणे : ‘‘पर्यावरणाचे रक्षण आणि समाजातील सकारात्मक बदल हे केवळ मंत्र्यांच्या घोषणा, सरकारी धोरणे किंवा आंतरराष्ट्रीय करारांतून घडणार नाहीत. हा बदल विद्यापीठांमधून, तरुणांच्या आणि लोकांच्या थेट सहभागातूनच शक्य आहे. निसर्ग हा साडेचार अब्ज वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेला महान शिक्षक आहे, मात्र दुर्दैवाने माणूस त्याचा सर्वांत वाईट विद्यार्थी ठरला आहे,’’ अशी खंत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. राजेंद्र शेंडे यांनी व्यक्त केली.