पुणे : केंद्र सरकारच्या टपाल जीवनविमा योजना आणि ग्रामीण डाक जीवन विमा योजनेअंतर्गत बंद झालेल्या पॉलिसी 31 डिसेंबरपर्यंत पुनरुज्जीवित करता येतील, अशी माहिती भारतीय डाक विभागाचे अधीक्षक बी. पी. एरंडे यांनी दिली.
पॉलिसी ज्या खंडित झालेल्या असतील तसेच पॉलिसी सुरू केल्यापासून सतत 5 वर्षे भरणा न केल्याने बंद पडल्या असतील, तर त्यांना पुनरुज्जीवित करत सर्वसामान्य विमाधारकांना विमा लाभ मिळू शकतो.
पॉलिसीचे पुनरुज्जीवन करताना विमाधारकांचे स्वस्थ असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याचे डाक विभागाने कळविले. तसेच विमा लाभ मिळविण्यासाठी पॉलिसीधारकांनी जवळच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये लेखी अर्ज करता येईल. दरम्यान 31 डिसेंबरनंतर पॉलिसीचे पुनरुज्जीवन केले जाणार नसून, त्या त्वरित रद्द केल्या जातील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.