लॉकडाउनमध्ये ३ लाख टन मालाची निर्यात

vegetables
vegetables
Updated on

पुणे - राज्यातील पणन मंडळाच्या सुविधा केंद्रावरून एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे २ लाख ९९ हजार ९५० टन विविध प्रकारच्या शेतीमालाची निर्यात झाली. तर मागील वर्षी याच काळात ३ लाख ४० हजार ५२६ टन शेतीमाल निर्यात झाला होता. कोरोना संसर्गामुळे भारतासह अनेक देशात लॉकडाउन होते. तरीही पणन मंडळाने अनेक योजना राबावून शेतीमाल निर्यात केला आहे. 

दरम्यान, गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा केळी, लिंबू , मिरची, आले या शेतीमालाची निर्यात वाढली आहे. तर कांदा, द्राक्षे, आंबा, डाळिंब या प्रमुख शेतीमालाची निर्यात घटली आहे. लॉकडाउनच्या काळात पणन मंडळाने विशेष निर्यात कक्ष स्थापन केल्याने काही शेतीमालाच्या निर्यातीमध्ये वाढ झाली आहे.

आंबा निर्यातीसाठी कोरोनाच्या काळात एनपीपीओ या अधिकाऱ्यांच्या निरीक्षणाखाली आंब्यावर प्रक्रिया करून जपान येथे १४ टन तर युरोपात ३५ टन निर्यात करण्यात आला. तसेच मार्चमध्ये कांद्याची निर्यात बंदी उठल्यानंतर अद्यापपर्यंत मध्यपूर्व आशिया देशात, श्रीलंका आणि दक्षिणपूर्व देशात सुमारे ३ लाख टन कांदा निर्यात करण्यात आला आहे. तसेच भेंडी, हिरवी मिरची, दुधी भोपळा यासह काही पालेभाज्या फ्रेटद्वारे जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रोलिया या देशात निर्यात करण्यात आली. तसेच लॉकडाउनमुळे बांगलादेश सीमेवर संत्र्याचे अनेक ट्रक अडकले होते. परंतु राज्य पणन मंडळाने तातडीने पश्‍चिम बंगाल सरकारसोबत चर्चा आणि पत्रव्यवहार करून ते मार्गस्थ केले, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com