.....म्हणुन शेतकऱ्यांनी चक्क स्वत:च्या शेतात सोडली जनावरे

farmer left Animals in cauliflower Farm due to low market price
farmer left Animals in cauliflower Farm due to low market price

पारगाव (पुणे) : पालेभाज्यांबरोबर तरकारी मालाचेही बाजारभाव गडगडल्याने मजुरीही सुटत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी फ्लावरच्या शेतात अक्षरश: जनावरे सोडुन दिली आहे. यावर्षी अतिपावसामुळे कांद्याची रोपे नष्ट झाली त्याचबरोबर बटाटा बियाणेचेही बाजारभाव गगनाला भिडल्याने कांदा व बटाटा लागवडीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली. 

आंबेगाव तालुक्याच्या पुर्व भागातील जारकरवाडी, पोंदेवाडी, काठापुर बुद्रुक, देवगाव, लाखणगाव, पारगाव, मेंगडेवाडी, खडकवाडी  परिसरातील शेतकरी तरकारी पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळला. यावर्षी पाऊस चांगला झाला हवामानही पोषक असल्याने तरकारी मालांची वाढही जोरात झाली उत्पादन वाढल्याने बाजारात आवक वाढली त्यामुळे तरकारी मालाचे भाव गडगडले आहे.

प्रती दहा किलोचे बाजारभाव पुढील प्रमाणे
काकडी 10 ते 70 रुपये
दोडका 10 ते 180 रुपये 
फ्लावर 10 ते 40 रुपये 
गवार 40 ते 430 रुपये 
ढोबळी मिरची 50 ते 200 रुपये
भेंडी 50 ते 320 रुपये
हिरवी मिरची 100 ते 450 रुपये
वालवड 100 ते 150 रुपये


बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. मजुरीही सुटत नसल्याने फ्लावर उत्पादक शेतकऱ्यांनी काढणी योग्य झालेल्या फ्लावरच्या शेतात जनावरे सोडून दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com