फास्ट टॅग वापरणाऱ्यांना दिलासा; १ फेब्रुवारी २०२६ पासून केवायव्ही प्रक्रिया बंद
जोड
फास्टॅग वापरणाऱ्यांना दिलासा
नवी दिल्ली : वाहनचालकांचा त्रास कमी करण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक फेब्रुवारी २०२६ पासून मोटार, जीप आणि व्हॅनसाठी नवीन फास्टॅग काढताना ‘नो यूवर व्हेईकल’ (केवायव्ही) ही प्रक्रिया पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फास्टॅग सुरू झाल्यानंतर अनेक वाहनचालकांना सर्व कागदपत्रे वैध असूनही ‘केवायव्ही’मुळे वारंवार फोन, मेसेज, कागदपत्रांची मागणी आणि विलंब सहन करावा लागत होता. आता हा त्रास थांबणार आहे.
नव्या निर्णयानुसार, ज्यांच्या मोटारीवर फास्टॅग आधीच आहे, त्यांच्यासाठी आता ‘केवायव्ही’ बंधनकारक नसेल. फास्टॅग सैल, चुकीचा असेल किंवा फास्टॅगचा गैरवापर होत असल्याची तक्रार आली तरच ‘केवायव्ही’ची गरज पडणार आहे. वाहनचालकांना होणारा त्रास टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग देणाऱ्या बँकांवर जबाबदारी टाकली आहे. वाहनाची माहिती वाहन डेटाबेसमध्ये तपासल्याशिवाय फास्टॅग सुरू होणार नाही. आधी फास्टॅग सुरू झाल्यावर होणारी तपासणी आता बंद होईल. वाहनामध्ये माहिती नसेल, तर फास्टॅग सुरू करण्याआधी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) तपासले जाईल. ऑनलाइन घेतलेला फास्टॅगही पूर्ण तपासणीनंतरच सुरू केला जाईल.
वाहनचालकांना फायदा
-फास्टॅग सुरू झाल्यानंतर पुन्हा कागदपत्रे देण्याची गरज नाही
- बँक किंवा एजन्सींचे फोन-मेसेज बंद होणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

