
पुणे : खरीप हंगामात शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या खत विक्रेत्यांवर कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. युरिया खताच्या साठ्यात तफावत आढळल्यानंतर राज्यातील ८६ कृषी विक्री केंद्रांचे परवाने निलंबित, तर आठ केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत.