लघुउद्योजकांचे केंद्राला आर्थिक मदतीचे साकडे

Small-Industry
Small-Industry

पिंपरी - लॉकडाउन संपल्यानंतर लघुउद्योजकांना भांडवलाची अडचण निर्माण होणार आह. त्यामुळे या संकटातून बाहेर काढण्यासाठी देशातील सर्व लघू, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकारने २५ हजार कोटींचे पॅकेज देण्याची मागणी करणारे पत्र शहरातील लघुउद्योजकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पाठविले आहे. 

लॉकडाउन संपल्यानंतर उत्पादन सुरू करण्यासाठी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांकडे भांडवल अपुरे पडणार आहे. अनेकांनी मोठ्या कंपन्यांना केलेल्या कच्च्या मालाच्या पुरवठ्याची रक्‍कम हे कारखाने बंद असल्यामुळे हातात पडलेली नाही.

लॉकडाउननंतर मोठ्या कंपन्या सुरू झाल्या तरी ही रक्‍कम लघुउद्योजकांना हातात पडण्यासाठी पंधरा ते वीस दिवसांचा अवधी लागू शकतो. त्यामुळे लघु उद्योजकांना उत्पादन करणे कठीण होणार आहे. लॉकडाउननंतर मोठ्या कंपन्यांकडे थकित असणारी लघुउद्योजकांची रक्‍कम आठवड्याभरात देण्यात यावी, अशी सूचना सरकारने करावी, अशी मागणी या उद्योजकांनी केली आहे. 

केंद्र सरकारने देशातील लघुउद्योजकांसाठी पंचवीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, तरच लघुउद्योजक संकटातून वाचतील, असे पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com