raghuvir khedkar
sakal
पुणे - ‘समाजात समरसता वृद्धिंगत करण्यासाठी लोककलावंतांची भूमिका महत्त्वाची असली, तरी प्रत्यक्षात आजही लोककलावंत उपेक्षित जीवन जगत आहेत. लोककलावंतांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पुढील महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुन्हा संमेलन आयोजित करण्यात आले नाही, तर पद्मश्री पुरस्कार परत करेन,’ असा इशारा समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष रघुवीर खेडेकर यांनी रविवारी दिला.