

दिवसातून १० वेळा लाईट जातेय! उरुळी कांचनमध्ये महावितरणचा मनमानी कारभार.
Sakal
सुनील जगताप
उरुळीकांचन : उरुळी कांचन येथे गेल्या अनेक दिवसांपासून विजेचा लपंडाव चालू असून या लपंडावामुळे उरुळी कांचन मधील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे,शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.महावितरणच्या स्थानिक कार्यालयांमधील अधिकाऱ्यांना याची कल्पना देऊनही परिस्थितीमध्ये काहीही फरक होत नाही.उरुळी कांचन मधील वीज पुरवठ्यावर अवलंबून असलेल्या छोट्या व्यावसायिकांनी यात तातडीने सुधारणा व्हावी अशी मागणी केली आहे.