
पुणे - प्रथम सत्रातील परीक्षांच्या गुणांच्या आधारे अकरावीचा निकाल लावण्याचा निर्णय अकरावीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. त्याऐवजी या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकरावीची प्रवेशप्रक्रिया यंदा लांबली होती, त्यामुळे अनेक महाविद्यालयांमध्ये सप्टेंबर महिन्यात त्यांचे वर्ग सुरू झाले. तसेच यावर्षी इयत्ता अकरावीचा अभ्यासक्रम बदलला, नवीन पाठ्यपुस्तके आली, शिक्षकांना त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले नाही. विद्यार्थ्यांना फारसे न शिकताच पहिली सत्र परीक्षा यंदा द्यावी लागली, त्याचा विपरीत परिणाम गुणांवर झाला आहे.
दुसऱ्या सत्रात अकरावीचे विद्यार्थी खऱ्या अर्थाने शिकू लागतात आणि त्यानंतर होणाऱ्या परीक्षांमध्ये ते चांगले गुण मिळवतात. दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. अभ्यास करायाला देखील पुरेसा वेळ मिळतो. त्यामुळे दोन्ही सरासरी गुणांनी हे विद्यार्थी उत्तीर्ण होतात. मात्र केवळ पहिल्या सत्राच्या निकालावर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय अन्यायकारक ठरणार आहे, असे डॉ. शिंदे यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी निर्णय प्रक्रिया राबवावी. शालेय शिक्षण विभागाने परीक्षेसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी सूचविले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.