Artificial Intelligence
esakal
बारामती, ता. 28 : कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ सोयीसुविधा म्हणून नव्हे; तर राष्ट्रीय सामर्थ्य म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन अदानी उद्योगसमुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी आज येथे केले. देशातील सर्वात अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलेन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे उदघाटन रविवारी (ता. 28) गौतम अदानी व अदानी फाऊंडेशनच्याप्रमुख प्रीती अदानी यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.