
प्रज्वल रामटेके
पुणे : एकीकडे जगभरात हवामान बदलाची झळ जाणवत असताना जागतिक स्तरावर तापमान सरासरी १.६५ अंश सेल्सिअसने वाढले आहे, तर दुसरीकडे राज्यात फेब्रुवारीतच उष्णतेची लाट येण्यास सुरुवात झाली आहे. आतापासून योग्य पावले न उचलल्यास तीव्र दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ आणि पक्षी-प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होणे, असे धोके निर्माण होतील, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.