मंचर - आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार तसेच खेड तालुक्यातील काही गावांतील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेत राज्य शासनाने कलमोडी (आरळा) मध्यम प्रकल्पाच्या पाणी वापराच्या फेरनियोजनास मान्यता दिली आहे..या निर्णयामुळे एकूण ६ हजार ६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून अवर्षण प्रवण भागातील शेतीला मोठा आधार मिळणार आहे.' अशी माहिती माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.भीमानदीच्या आरळा उपनदीवर उभारण्यात आलेल्या कळमोडी धरणात जून २०१० पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा होत आहे. १९९७ मध्ये प्रकल्पास ५४.३१ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली..मूळ आराखड्यानुसार सातगाव पठार उपसा सिंचन योजनेतून ५ हजार ०६५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, आठमाही पाणीपुरवठा धोरणानुसार फेरनियोजन केल्याने उन्हाळी हंगामासाठीची तरतूद वगळण्यात आली आणि ४ हजार ५८५ द.ल.घ.मी अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले.या अतिरिक्त पाण्याचा वापर करून भीमाशंकर आदिवासी उपसा सिंचन योजनेअंतर्गत एकलहरे व कुडे येथे ३०५ हेक्टर, तसेच वाफगाव, वरुडे, पूर व कन्हेरसर या गावांतील १ हजार २५२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे एकूण सिंचन क्षेत्रात १ हजार ५५७ हेक्टरची वाढ झाली आहे..ता.२६ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार, या फेरनियोजनामुळे सिंचन क्षेत्रात १० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. प्रकल्पांतर्गत सातगाव पठार उपसा सिंचन योजना दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्यात बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे खेड तालुक्यातील १ हजार ६२५ हेक्टर, तर दुसऱ्या टप्प्यात वेळनदीत पाणी सोडून कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील ३ हजार ४४० हेक्टर क्षेत्राला पाणी मिळणार आहे..'अनेक वर्ष शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दरवर्षी या भागात अनेक गावात टँकरद्वारे पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली जाते. हा प्रकल्प मार्गी लागल्यास गावे टँकर मुक्त होतील.- अशोक बाजारे, शेतकरी भावडी (ता. आंबेगाव)'दरवर्षी पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत होते. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.आता सिंचनाची सोय झाल्यास भाजीपाला व नगदी पिके घेणे शक्य होईल. रोजगार निर्मितीला वाव मिळेल. शहरात कामानिमित्त गेलेले तरुण गावी परततील'.- मनीषा सुनील तोत्रे, माजी सरपंच आदर्श गाव कुरवंडी (ता. आंबेगाव).दृष्टीक्षेपकलमोडी (आरळा) प्रकल्पाच्या पाणी फेरनियोजनास मान्यताएकूण ६ हजार ६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली४.५८५ द.ल.घ.मी अतिरिक्त पाणी उपलब्धसिंचन क्षेत्रात १ हजार ५५७ हेक्टरची वाढ.प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ४२.८७ द.ल.घ.मी असून त्यापैकी ४२.६७ द.ल.घ.मी पाणी उपयुक्त आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.